Wednesday 26 February 2014

दसरा(विजयादशमी)




नवरात्री संपल्यानंतर शेवट्चा दिवस म्हणजे दसरा यालाच विजयादशमी असेही म्हणतात. हा दिवस विजयाचा दिवस म्हणुन साजरा केला जातो. व्यक्ती आणि समाज यांच्यात वीरता प्रकटावी यासाठी दस-याचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सुरू केलेल्या कामात हमखास यश मिळणार, अशी समजूत आहे.दसरा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो.


हा सण आश्विन शुध्द दशमी हा दिवस आहे.  प्रभु रामचंद्रांच्या वेळेपासूनच हा दिवस साजरा केला जातो. रामचंद्राने रावणावर मात करण्यासाठी हयाच दिवशी प्रस्थान केले होते. तसेच पांडवांचा अज्ञातवास संपला तेव्हा त्यांनी याच दिवशी शमी वृक्षाचे पुजन करून आपली या वृक्षावर लपवीलेली शस्रास्रे पिन्हा घेतली. अशी माहीती महाभारतात मिळते.या दिवशी छत्रपती शिवाजी राजांनी औरंगजेबाला जेरीस आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

या सणाविशयी अनेक कथा आहेत. त्यपैकी एक म्हणजे रघुराजावर सीमोल्लंघनाचा प्रसंग आला होता. त्यावेळ  रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजीत यज्ञ केला. व त्याने सर्व संपत्तीचे दान केले.  आणि  तो एका पर्णकुटीत राहिला. वरतंतुचा शिष्य कौत्स तिथे दक्षिणा मागण्यासाठी आला. त्याला १४ कोटीसुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघुराजालाला वाटले जर कौत्स्न घेता रिकाम्या हाताने गेला तर आपल्या सात पिढ्या लज्जित होतील. हे हौ द्यायचे नाही म्हणुन त्याने कुबेराला युध्दाचे आव्हान दिले. कुबेराने घाबरुन आपटा शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. त्यातील फक्त  १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्स घेवुन जातो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. तेव्हापासुन या वृक्षाने वैभव दिले म्ह्णुन याचे पुजन केले जाते.

दसरा शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दस-यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.

No comments:

Post a Comment