Thursday 13 February 2014

मकर संक्रांती


                                    
पौष महीन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, आणि संक्रांत म्हणजे संक्रमण. म्हणजेच पुढे जाणे. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत असतो. म्हणून  या काळाला उत्तरायणही म्हणतात. म्हण्जे सूर्य मकर राशीत आला की मकर संक्रांत होते. या दिवसानंतर सूर्य उत्तरेकडे सरकू लागतो.व दिवस थोडा थोडा मोठा होत जातो.
  
संक्रांतीचा हा सण तीन दिवसांचा असतो. भोगी, संक्रांत, व किक्रांत असे तीन सण एकत्र येतात.शेतक-याच्या दृष्टीने हा सण महत्वाचा असतो. मार्गशीर्ष- पौष हे महीने म्हणजे सुगीचे दिवस असतात. या काळात गहू-शाळू पिकलेला असतो, तसेच हरभरा, वालपापडा, ओल्या शेंगा आदि पिके आलेली असतात, यावेळी शेतकरी वर्गाच्या कष्टाला यश मिळते म्हणून हा सण समाधानाचा सण असे म्हटले जाते.
                   
संक्रांत ही थंडीच्या दिवसात येत असते. थंडीत शरीराचे अवयव आखडून गेलेले असतात. रक्तभिसरण मंद होण्याची शक्यता असते,रक्तवाहीन्यांवर थंडीचा परिणाम होत असतो. असतो. अशा वेळी शरीराला स्निग्धतेची गरज असते.आणि तीळात हा स्निग्धतेचा गुण आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने तिळ या ऋतुतील आदर्श खाद्याची गरज पुर्ण करतात. हे तिळ औषध म्हणुन काम करू शकते. तिळ आणि गुळ यांत उष्णता निर्माण करण्याचा  गुण असल्यानेही  तिळ आणि गुळ या दिवशी वाटले जातात. तसेच या दिवशी पतंग उडविण्याची प्रथा आहे. सामान्यतः पतंग उडविण्यासाठी मोकळ्या मैदानात, किंवा इमारतीच्या छ्परावर जावे लागते. त्यामुळे थंडीत सुर्याचे ऊन मिळते हा त्यामागचा हेतू आहे.

मकर संक्रांतीच्या अनेक कथा आहेत.त्यापैकी एक म्हणजे पूर्वी संकरासुर नावाचा एक दैत्य होता. तो खुप उपद्रवी होता. त्याचा नाश करण्यासठी संक्रांती देवीने भयंकर रूप धारण केले. ही देवता साठ योजने पसरली असुन तिचे नाक-ओठ लांब असून तिला नऊ हात असून तिची आकृती पुरूषाची आहे,प्रत्येक वर्षी तीचे वाहन, आयुध, तिची भूषणे बदलतात, अशी कल्पना आहे.

संक्रांतीच्या दिवशी काही सुवासिनी पाटावर संक्रांतीचे चित्र काढून त्याची पूजा करतात. गूळ-खोब-याचा नैवेद्य दाखवितात. त्या दिवशी संध्याकाळी सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलवितात. एका मातीच्या मडक्यात भुईमुग, गाजर, उसाचे तुकडे, शेंगा, पैसा, सुपारी इ. ठेवून त्याची पूजा करतात. तसेच संक्रांत हा स्रियांचा- विशेष करून लग्न झालेल्या मुलींचा सजण्याचा सण लग्नानंतर संक्रांतीला पहील्या वर्षी तिळवणीचा सण करण्याची महाराष्ट्रात पध्द्त आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलीला हलव्याचे दगिने घालून सजवितात. हा एक सण असा आहे की, जो सासू सुनेसाठी करते.

No comments:

Post a Comment