सण आणि उत्सव
“उत्सवप्रियः खलु मनुष्यः”
असे महकवी कालिदास यांनी म्हटले आहे आणि ते
शंभर टक्के बरोबर आहे. माणूस हा खरोखर उत्सवप्रिय आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतित
सण आणि अत्सवांना विशेष महत्व आहे. सण असो किंवा कोणताही समारंभ असो,
त्यात सर्वजण उत्साहने सहभागी होतात.सण,
उत्सव, व्रते,समरंभ या स्वरुपात आप्ल्याला थोर दिर्घकालीन
वारसा लाभला आहे.हा वरसा जोपासलाआहे, विषेश म्हणजे भारतीय संस्कृति ही आजपर्यत टिकून आहे,
त्याचे सर्वात जास्त श्रेय येथील सण आणि उत्सवांनाच आहे.कारण प्रत्येक सण हा या
देशाच्या वेगवेगळ्या संस्कृतिचे प्रतिक आहे. प्रत्येक सणात आपल्या संस्कृतिचे
प्रतिक दिसते.
सातशे वर्षापूर्वी महरष्ट्रात देवगिरीच्या यादव रजाची सत्ता होती.यादवांच्या
मुत्सद्दी कारभारी, थोर,स्थापत्यशास्र्,
मोडी लिपीचा प्रवर्तक, हेमांद्री तथा हेमांडपत याने त्यावेळी ‘चतुवर्गचिंतामाणी’
नावाचा एक ग्रंथ पाच खंडातून लिहीला. वर्षतील तीनशे पासष्ट दिवसात कोणते सण साजरे
करावेत,
कोणत्या व्रतांचे पालन
करावे,
हे सांगणारा ग्रंथ लिहिला. यावरून त्यावेळच्या समाजजीवनाचे दर्शन घडते. तसेच मणसामणसांच्या
एकत्र येण्यातूनच सण- उत्सवांची निर्मिती झाली अणि आज ते आपल्या भाषेचे,संस्कृतिचे,
धर्मभावनेचे अविभाज्य घटक बनले आहेत. हे सण सजरे करण्यामागे
शैक्षणिक,
धर्मिक,सांस्कृतिक, सामाजीक आसे अनेक कारणे आहेत,
पण त्याचप्रमाणे व्यापक असा समाजरचनेचा घटक म्हणजे कुटुंब
यासाठीही सणांना मोठ्या प्रमाणात महत्व असते.लोकाना एकत्र
आणण्यासाठी हे सण महत्वाचा रोल निभावतात. पूर्वी दळणवळणाच्या साधने उपलब्ध नव्हती
त्यावेळी एकमेकांना भेटण्यासाठी किंवा मुलींना माहेरी जाण्यासठी हे एक कारण असे.सर्वजण
एकत्र येवून गोडधोड बनवत.सणांच्या निमित्ताने घरात अनेक पदार्थ बनवले जातात. या
सर्वामागे परंपरा आणि मानवी मुल्ये आहेत. व्यक्ती आणि समाजाचे न तुटणारे नाते आहे. हे सबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी सण हातभार लावतात. माणसामाणसांना सर्व प्रकारचे भेद
विसरून बंधुभाव व राष्ट्रीय एकात्मता साध्या करण्यासाठी,सामाजीक अभिसरणासाठ, विचार-अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी सण-उत्सवाचा उपयोग होतो.सुखी व समृध्द जीवनासाठी
सुयोग्य संस्काराची गरज आहे.अशा सुसंस्काराच्या अखंड वाहणा-या प्रवाहात आपला जन्म
होतो.आपण साजरे करतो ते सण आणि उत्सव हा त्या प्रवाहाचाच दृश्य आविष्कार आहे.
भारत हा विविधतेने नटलेला आहे वेगवेगळे पंथ,धर्म,जात,भाषा,
विचारही वगवेगळे आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती जरी एकात्म असली तरी येथील सण- उत्सव साजरे
करण्यातही विविधता आहे. एकच सण अनेक ठीकाणी वेगवेगळ्या पध्द्तीने साजरा केला जातो. उदा- मकर
संक्राती ही लोहाडी,लोहळी,
संक्राती,पतगाणू, तहेबार,पोगल आदी नावानी वेगवेगळ्या भागात ओळखला जातो. भारतात असंख्य सण साजरे केले जातात. त्यांची सख्या सागणे कठीण आहे. तसेच
महाराष्ट्रातही अनेक सण साजरे होतात. त्यात गुढीपाडवा हा नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. तसेच दसरा,दिवाळी,नवरात्र,नारळी पोर्णिमा,गणपती,होळी असे मोठे सण सर्व ठीकाणी साजरे होतात.
👍👍👍👍👍👍
ReplyDelete