

या सणाविशयी अनेक कथा आहेत. त्यपैकी एक म्हणजे रघुराजावर
सीमोल्लंघनाचा प्रसंग आला होता. त्यावेळ रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजीत यज्ञ केला. व त्याने सर्व संपत्तीचे दान केले. आणि तो एका पर्णकुटीत राहिला. वरतंतुचा शिष्य
कौत्स तिथे दक्षिणा मागण्यासाठी आला. त्याला १४ कोटीसुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघुराजालाला वाटले जर कौत्स्न घेता रिकाम्या हाताने गेला तर आपल्या
सात पिढ्या लज्जित होतील. हे हौ द्यायचे नाही म्हणुन त्याने कुबेराला युध्दाचे
आव्हान दिले. कुबेराने घाबरुन आपटा व शमी वृक्षांवर सुवर्णाचा वर्षाव करतो. त्यातील फक्त १४ कोटी सुवर्णमुद्रा कौत्स घेवुन जातो. बाकीचे सुवर्ण प्रजाजन नेतात. तेव्हापासुन या
वृक्षाने वैभव दिले म्ह्णुन याचे पुजन केले जाते.
दसरा शेतकर्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण नवरात्रात नऊ दिवसात उगवलेली रोपे शेवटच्या दिवशी दस-यास वाहतात. तसेच शेतकरीही शेतात तयार झालेल्या भाताच्या लोंब्या आणून त्याची पूजा करतात. प्रवेशद्वारावरही टांगतात. याशिवाय घरातील विविध भांड्यांना धान्याची कणसे बांधण्याची प्रथा कोकणात आहे. बंगालमध्येही अशाच प्रकारचा एक विधी होतो. तेथे स्त्रिया गवताची पेंढी धान्याच्या कोठारास बांधतात. त्याला बावन्न पोटी असे म्हणतात. म्हणजे हे धान्य बावन्न पट होऊ दे.